पोलिस प्रशासन न्यूज.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी:पुरुषोत्तम वीर


बीड: सततच्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात वंचित बहुजन आघाडीने हिरापूर, ईटकुर आणि आहेर चिंचोली शिवारातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

​वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, जिल्हा सह-संघटक अर्जुन जवंजाळ, शहराध्यक्ष लखन जोगदंड आणि कार्यकर्ते मिलिंद सरपते व अरविंद इनकर यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी बहिरामा आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.

​या पाहणीनंतर, शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता, तात्काळ मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे केली आहे. तसेच, शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

​या संकटाच्या काळात वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या सोबत असून, त्यांच्या हक्कासाठी सदैव लढत राहील, असेही या वेळी सांगण्यात आले.


6
कृपया वोट करा

NEW MAHARASHTRA LIVEच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!